आधुनिक मिरची लागवड कशी करावी?
महाराष्ट्रातील मिरची खालील एकूण क्षेत्राापैकी 68 टक्के क्षेत्र नांदेड जळगांव धुळे सोलापूर कोल्हापूर नागपूर अमरावती चंद्रपूर उस्मानाबाद या जिल्हयात आहे. मिरचीमध्ये अ. व क. जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्याने मिरचीचा संतुलीत आहारात समावेश होतो. तिखटपणा व स्वाद यामुळे मिरची हेक्टरी महत्वाचे मसाल्याचे पिक आहे. मिरचीचा औषधी उपयोग सुध्दा होतो.
हवामान
मिरचीला 40 इंचापेक्षा कमी पाऊस असणे चांगले मिरचीच्या झाडांची आणि फळांची वाढ 25 ते 30 सेल्सिअस तापमानाला चांगली होते. आणि उत्पादनही भरपूर येते. तापमानातील तफावतीमुळे फळे फुले गळ मोठया प्रमाणात होते. व उत्पन्नात घट येते. बियांची उगवण 18 ते 27 सेल्सिअस तापमानास चांगली होते. मिरची लागवड कशी करावी
जमीन
पावसाळयात तसेच बागायती मिरचीसाठी मध्यम काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी. उन्हाळयात मध्यम ते भारी जमिनीत मिरचीची लागवड करावी. चुनखडी असलेल्या जमिनीतही मिरचीचे पिक चांगले येते.
हंगाम
वाण
पंत सी – १ : हिरव्या व लाल (वाळलेल्या ) मिरचीच्या उत्पादनाला ही जात चांगली आहे. या जातीची फळे उलटी असतात. मिरची पिकल्यावर फळांचा आकर्षक लाल रंग येतो. फळे 8 ते 10 सेमी लांब असून साल जाड असते. फळांतील बियांचे प्रमाण अधिक प्रमाणात असून बोकडया रोगास प्रतिकारक आहे.
संकेश्वरी 32 : या जातीची झाडे उंच असतात. मिरची 20 ते 25 सेमी लांब असून पातळ सालीची असतात. सालीवर सुरकुत्या असतात. वाळलेल्या मरचीचा रंग गर्द लाल असतो.
जी – 2, जी – 3, जी – 4, जी – 5 या जातीची झाडे बुटकी असतात. या मिरचीच्या अधिक उत्पादन देणा-या चांगल्या जाती आहेत. फळाची लांबी 5 ते 8 सेमी असून फळांना रंग गर्द तांबडा असतो.
मुसाळवाडी – या जातीची झाडे उंच वाढतात. खरीप हंगामासाठी ही जात चांगली असून बोकडया, भूरी आणि डायबॅक या रोगांना कमी प्रमाणात बळी पडतात.
पुसा सदाबहार – या जातीची झाडे उंच असून पाने इतर जातीपेक्षा रूंद असतात. पिकलेली मिरची तेजस्वी लाल रंगाची असते. या जाती हिरव्या मिरचीचे सरासरी उत्पादन साडेसात ते दहा टन व वाळलेल्या मिरचीचे दीड ते दोन टन उत्पादन मिळते. ही जात मावा कोळी या किडींना तसेच डायबॅक आाणि विषाणूंजन्य रोगांना प्रतिकारक आहे.
या शिवाय विद्यापीठांनी विकसीत केलेंडर अग्निरेखा, परभणी टॉल , फूले ज्योती, कोकणक्रांती, फूले मुक्ता फूले सुर्यमुखी, एनपी- 46 या सारख्या अधिक उत्पादन देणा-या जाती लागवडीयोग्य आहेत.
बियाणाचे प्रमाण
पूर्वमशागत
लागवड
बी पेरण्यासाठी 8 ते 10 सेमी अंतरावर वाफयाच्या रूंदीला समांतर ओळी हतयार करून त्यामध्ये 10 टक्के फोरेट दाणेदार 15 ग्रॅम दर वाफयाला टाकून मातीने झाकून घ्यावे. त्यानंतर या ओळीमध्ये दोन सेमी ओळीवर बियांची पातळ पेरणी करावी व बी मातीने झाकून टाकावे. बियाण्यांची उगवण होईपर्यंत वाफयांना दररोज झारीने पाणी द्यावे. बी पेरल्यानंतर 30 ते 40 दिवसांनी रोपे लागवडीस तयार होतात.
उंच आणि पसरट वाढणा-या जातींची लागवड 60 बाय 60 सेमी अंतरावर आणि बुटक्या जातींची लागवड 60 बाय 45 सेमी अंतरावर करावी. कोरडवाहू मिरचीची लागवड 45 बाय 45 सेमी अंतरावर करावी. रोपांची सरीवरंबा पध्दतीवर लागवड करावी. रोपे गादीवाफयातून काढल्यानंतर लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे 10 लिटर पाण्यात 15 मिली मोनोक्रोफॉस 36 टक्के प्रवाही अधिक 25 ग्रॅम डायथेनम 45 अधिक 30 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक 80 टक्के मिसळलेल्या द्रावणात बुडवून लावावेत.
खते आणि पाणी व्यवस्थापन
नत्राची उर्वरीत अर्धी मात्रा रोपांच्या लागवडीनंतर 30 दिवसांनी बांगडी पध्दतीने द्यावी.मिरची बागायती पिकाला जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी पाणी देऊ नये. झाडे फूलावर आणि फळावर असताना झाडांना पाण्याचा ताण देऊन रोपे लावणीनंतर 10 दिवसात शेतात रोपांचा जम बसतो. या काळात 1 दिवसाआड पाणी दयावे. त्यानंतर 5 दिवसांच्या किंवा एक आठवडयाच्या अंतराने पाणी दयावे. साधारणतः हिवाळयात 10 ते 15 दिवसांच्या अंतराने तर उन्हाळयात 6 ते 8 दिवसांच्या अंतराने पिकाला पाणी दयावे.
आंतरमशागत
रोग आणि किड
रोग
मर : हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. लागण झालेली रोपे निस्तेज आणि मलूल होतात. रोपाचा जमिनी लगतचा खोडाचा भाग आणि मुळे सडतात. त्यामुळे रोप कोलमडते.
उपाय : 10 लिटर पाण्यात 30 ग्रॅम कॉपरऑक्झीक्लोराईड 50 टक्के मिसळून हेक्टरी द्रावण गादी वाफे किंवा रोपांच्या मुळा भोवती ओतावे.
फळे कुजणे आणि फांद्या वाळणे : ( फ्रूट रॉट अॅड डायबॅक ) हा रोग कोलीटोट्रीकम कॅपसीसी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या हिरव्या किंवा लाल मिरचीवर वतुळाकार खोलगट डाग दिसतात.
दमट हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चटटे दिसतात. अशी फळे कुजतात आणि गळून पडतात. बुरशीमुळे झाडाच्या फांद्या शेंडयाकडून खाली वाळत जातात. प्रथम कोवळे शेंडे मरतात. रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडे सुकून वाळतात तसेच पानांवर आणि फांद्यांवर काळे ठिपके दिसतात.
उपाय : या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खुडून त्यांचा नाश करावा. तसेच डायथेन झेड-78 किवा डायथेन एम 45 किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक औषध 25 ते 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच दर 10 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 वेळा फवारावे.
भुरी ( पावडरी मिल्डयू ) : भूरी रोगामुळे मिरचीच्या पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूवर पांढरी भूकटी दिसते. या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडाची पाने गळतात.
उपाय : भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच 30 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक किंवा 10 मिलीलिटर कॅराथेन 10 लिटर पाण्यात मिसळून मिरचीच्या पिकावर 15 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
किड
फूलकिडे : हेक्टरी किटक आकाराने अतिशय लहान म्हणजे 1 मिली पेक्षा कमी लांबीचे असतात. त्यांचा रंग फिकट पिवळा असतो. किटक पानावर ओरखडे पाडून पानाचे रस शोषण करतात. त्यामुळे पानाच्या कडा वरच्या बाजूला चुरडलेल्या दिसतात. हेक्टरी किटक खोडातील रसही शोषून घेतात. त्यामुळे खोड कमजोर बनते व पानांची गळ होते.
उपाय : रोपलावणीपासून 3 आठवडयांनी पिकावर 15 दिवसांच्या अंतराने 8 मिलीमिटर डायमेथेएम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
मावा : हेक्टरी किटक मिरचीची कोवळी पाने आणि शेडयांतील रस शोषण करतात. त्यामुळे नविन पालवी येणे बंद होते.
उपाय : लागवडीनंतर 10 दिवसांनी 15 मिली मोनोक्रोटोफॉस 36 टक्के प्रवाही 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
काढणी व उत्पादन
जातीपरत्वे ( बागायती) हिरव्या मिरच्यांचे हेक्टरी 80 ते 100 क्विंटल उत्पादन मिळते. वाळलेल्या लाल मिरच्यांचे उत्पादन 9 ते 10 क्विंटल निघते. व कोरडवाहू मिरचीचे उत्पादन 6 ते 7 क्विंटल येते. मिरची लागवड कशी करावी
संदर्भ: -krishi.maharashtra.gov.in
Type here..call me 7057816868 mla lavychi
Mirchi mahiti
मिरची लागवड माहिती द्या कोणती जात कधी लागवड करायची आणि त्याचे संगोपन या विषयी माहिती द्यावी
लाल जमीन आणि काळी जमीन आहे यात कोणत्या प्रकारचे बियाने वापरायचे.